
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल’, उद्धव ठाकरेंचं मनसेसोबतच्या युतीवर सर्वात मोठं विधान!
राज्यातील विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्रच पालटून गेलं आहे. एकीकडे भाजप, शिवसेना (शिंदे) हे मजबूत स्थितीत आलेले असताना दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू म्हणजेच शिवसेना (UBT) आणि मनसे यांना आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे.अशावेळी मागील काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे लवकरच एकत्र येतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आज (6 जून) उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीवर सर्वात मोठं विधान केलं आहे.
‘जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल.’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत थेट आणि स्पष्टपणे संकेत दिले आहेतमातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलं आहे. त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय.’संदेश कशाला मी बातमीच देईल ना तुम्हाला.. माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही. त्यांचे सुद्धा जे काही सैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. माझं म्हणणं आहे की, संदेश वैगरे देण्यापेक्षा आम्ही जी काही बातमी द्यायची ती बातमी देऊ.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सध्या चर्चा सुरू असल्याचं जाहीर केलं आहे.महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना (UBT) यांच्यातील युतीच्या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे.