पोमेंडी बुद्रूक सरपंच ममता जोशींची २६ जानेवारी रोजी दिल्लीतील कार्यक्रमासाठी निवड.

दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्यासाठी राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एका सरपंचाची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरी शहरानजिकच्या पोमेंडी बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता अंकुश जोशी यांची निवड झाली आहे.केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्याच्या पंचायत राज विभागाच्या संचालकांनी ही निवड केली आहे. विविध कामगिरीचा आढावा घैत ही निवड झाली आहे.

केंद्र शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेवून ही निवड करण्यात आली आहे. राज्यातील ३४ सरपंच विशेष अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहण्याचा मान केंद्र शासनाने दिला आहे. जिल्ह्यामधून रत्नागिरीनजिकच्या पोमेडी बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता अंकुश जोशी यांची निवड झाल्याने त्यांचे कौतूक होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button