प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कोकण मार्गावर रत्नागिरीत लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित होणार.

कोकण रेल्वे मार्गावर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रत्नागिरीत लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित होणार आहे. या पोलीस ठाण्यात १४० पोलिसांचा तापा दिमतीला असणार आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे. कोकण रेल्वेगाड्यांमधील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे. याशिवाय चोर्‍यांसह विनयभंगाच्या तक्रारी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तातडीने नोंदवणे शक्य होणार असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेत नवी भर पडणार आहे.रोहा रेल्वेस्थानकापासून कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. या हद्दीतील प्रवाशांच्या सुरक्षेसह गुन्ह्यांच्या तपासाची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे.

कोकण मार्गावर रेल्वे गाड्यांतून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांचे दागिने लंपास करण्यासह त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सर्रासपणे वाढत आहेत. रेल्वे डब्यातील आरक्षित आसनांवर प्रवासी गाढ झोपल्याची संधी साधत चोरट्यांकडून मोबाईलही हातोहात लांबवले जात आहेत.या सार्‍या गुन्ह्यांची तक्रार बर्‍याचवेळा मुंबईत आल्यानंतर संबंधित प्रवाशांना करावी लागते. रेल्वे सुरक्षा दल स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलीस करतात. तक्रारी देण्यास होणार्‍या विलंबामुळे गुन्ह्यांचा छडाच लागत नाही.

कोकण मार्गावरील हद्दीतून प्रवाशांना प्रवास सुरू झाल्यानंतर महिलांचे विनयभंग, छेडछाड व हाणामारीच्या तक्रारीही लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर येतात. मात्र कोकण मार्गावरील हद्दीत लोहमार्ग पोलिसांअभावी रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधत यथोचित कारवाई करण्याचे सोपस्कर पार पाडावे लागत होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button