
तुमच्या टाळुची सगळी केस गेली, तरी तुम्हाला अक्कलदाढ आली नाही- रामदास कदम यांच्यावर शिवसेना नेत्याची टीका.
शिवसेना ( शिंदे गट ) नेते, रामदास कदम यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख यांच्यावर टीका केली होती. 25 वर्षे मुंबई मनपा उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. मुंबईतून मराठी माणूस बाहेर जाण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत.तसेच, उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी केली, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला होता. आता शिवसेनेचे ( ठाकरे गट ) शरद कोळी यांनी रामदास कदम यांच्यासह यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
रामदास कदम हे पळपुटे आहेत. तुमच्या टाळुवरची सगळी केस गेली तरी तुम्हाला अक्कलदाढ आली नाही, असा हल्लाबोल शरद पवार कोळी यांनी केला आहे.शरद कोळी म्हणाले, “रामदास कदमांचा आजवर मान राखत होता. याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल आणि खपवून घेऊ असा नाही. रामदास कदम ज्या महापालिकेवर बोलत आहेत, त्याचं तुम्हीच वाटोळे केले आहे. मुंबई महापालिकेचे 91 हजार कोटी शिल्लक होते. मात्र, तुम्ही गद्दारी केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर 21 कोटी काढून महापालिकेचा सत्यानाश करण्याचं काम शिंदे गटानेकेला आहे.”रामदास कदमांच्या डोक्यात भुसा भरला आहे. कदमांनी अक्कल गहाण टाकली आहे का? बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’त तुकडे खाऊन कदम मोठे झाले.
शिंदेंनी तुम्हाला ओळखून तुमच्या औकातीत ठेवलं आहे. तुमचा बाजार उठला आहे. तुम्हाला भुंकण्याशिवाय काम नाही. तुमची ओळख पुसली गेलेली आहे,” असं कोळी यांनी सुनावलं आहे.”तुमच्यासारखा पळपुटा माणूस नाही. एखाद्या तमाशातील आणि नाटकातील कलाकार असतो, तसं तुम्ही रडायचे नाटक केले. रडल्यामुळे तुमच्या मुलाला बक्षीस म्हणून मंत्री करण्यात आले. तुमच्या टाळुची सगळी केस गेली, तरी तुम्हाला अक्कलदाढ आली नाही. यापुढे उद्धव ठाकरेंवर बोलल्यास तुमचा हिशोब घेतला जाईल. तुमची सगळी औकात महाराष्ट्राला माहिती आहे,” असं टीकास्रही कोळी यांनी सोडलं आहे.