
रत्नागिरी विभाग बेस्ट वाहतुकीमधून वगळण्याची मागणी मान्य
एस.टी. महामंडळाने सुरू केलेल्या बेस्ट वाहतुकीमध्ये सप्टेंबर २० ते मार्च २१ पर्यंत रत्नागिरी विभागाने सेवा बजावली होती. मात्र महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या मागणीनुसार पालकमंत्री अनिल परब यांनी तातडीने कार्यवाही केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या ‘बेस्ट’ वाहतुकीसाठी रत्नागिरी विभागातील कर्मचाऱ्यांना घाटकोपर येथे बेस्ट वाहतुकीसाठी जाण्याची सक्ती केली जात होती, याबाबत महाराष्ट्र एस.टी. कामगार विभागीय संघटनेतर्फे राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी विभाग बेस्ट वाहतुकीमधून वगळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार उदय सामंत यांनी याची दखल घेऊन परिवहनमंत्री व पालकमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरही मागणी मांडल्यानंतर त्यांनी ते मान्य केले
www.konkantoday.com