वाढलेल्या उष्म्यामुळे व उन्हामुळे निवडणूक प्रचारात कार्यकर्ता घामाघूम, सायंकाळच्या प्रचारावर जोर

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी रणधुमाळी सुरू झालेली असतानाच आलेल्या उष्णतेच्या लाटेचा तडाखा रिंगणाती उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही बसू लागला आहे. दुपारच्या कडाकाच्या उन्हात घामाच्या धारा निघत असल्याने आणि मतदारही बाहेर पडत नसल्याने सकाळचा प्रचार जेमतेम दोन तास होत असून सायंकाळी मात्र चार वाजल्यानंतरच प्रचाराला वेग येत आहे.लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वत्र राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याचे उल्लंघन होवू नये, याची काळजी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी मात्र यावेळीही पुरेपूर घेतलेली दिसत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुती, महाविकास आघाडीसह अन्य उमेदवारांकडून उमेदवारी अर्जही दाखल झाले असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button