
कोकण पश्चिम महाराष्ट्राला रेल्वेने जोडला जाणार
कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असताना यांनी पुढाकार घेऊन वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वे मार्गा होण्याच्या दृष्टीने गती दिली होती. आता केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. यामुळे हा मार्ग पाच वर्षात पूर्ण होऊन कोकण पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. एकशे आठ किमीच्या या मार्गासाठी तीन हजार चारशे चाळीस कोटी रुपये खर्च येणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूर्ग,लातूर, बीड सोलापूर तर कर्नाटकातील बेळगाव,बेळ्ळारी आणि गुलबर्गा आदि भाग जोडले जाणार आहेत.केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कोकणवासियांकडून स्वागत करण्यात येत असून हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
www.konkantoday.com