आरटीओ अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी-बंदरे विकासमंत्री नीतेश राणे.

रस्ते अपघाताला केवळ वाहन चालक जबाबदार नाहीत तर ज्यांच्याकडे कायद्याने अधिकार मिळाला आहे, असे आरटीओ अधिकारीही जबाबदार आहेत.एखाद्याने नियम मोडल्यास त्याच्याशी चर्चा करून सोडून दिले जाते. आता ही चर्चा कसली होते? हे स्पष्ट सांगण्याची गरज नाही. वाहन चालकांनी नियम कडक पाळावेत तर आरटीओ अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तरच वाढत्या अपघातांवर नियंत्रण येईल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी आज रस्ता सुरक्षा सप्ताह प्रारंभ कार्यक्रमात केले.सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे १ ते ३१ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे.

याचा प्रारंभ आज मंत्री राणेंच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सार्वजनिक बांधकामे कार्यकारी अभियंता अनिलकुमार सर्वगोड, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकानंदकिशोर काळे आदी उपस्थित होते. यावेळी विना अपघात एसटी चालविणारे चालक गणेश वेंगुर्लेकर, धर्मांना नडगिरे यांचा सत्कार करण्यात आला. विना अपघात रिक्षा चालविणाऱ्या चालकांच्यावतीने नारायण राऊळ यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. जीवनदूत म्हणून रस्ते अपघातात मदत करणाऱ्या संजय नकाशे, भालचंद्र टवटे, बाबली राणे, रुपेश बिडये यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button