आंबवपोंक्षे येथे सध्या प्रधान मंत्री सडक योजनेच्या कामात ठेकेदाराची मनमानी.

संगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे येथे सध्या प्रधान मंत्री सडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू आहे.सध्या या कामात ठेकेदाराकडून मनमानी सुरू असून, शेतकऱ्यांच्या शेतीचे अनधिकृत नुकसान करत काम चालू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.सुरू असलेल्या कामात चुना टाकलेल्या रेषेपलीकडे जाऊन शेतातून गटारे मारल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत.सदर रस्त्याची लांबी ही ९ मीटर इतकी असल्याने तेवढी जागा देण्यासाठी शेतकऱ्यांनी अनुमती दिली परंतु सध्या जेसीबी च्या साहाय्याने चुना मारलेल्या रेषेच्या बाहेर जाऊन शेतीची अनधिकृत खोदाई झाली आहे.

याची शेतकऱ्यांनी तक्रार ग्रामपंचायतीत केल्यावर या रस्त्याचा ठेकेदार ग्रामपंचायतीच्या कोणत्याच सुचनांकडे लक्ष देत नसल्याची माहिती आंबव पोंक्षे ग्रामपंचायतिचे सरपंच शेखर उकार्डे यांनी माध्यमांना सांगितले.ही बाब गंभीर असून ठेकेदारावर कारवाई ची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button