
खाद्यतेलाच्या दरात लिटरमागे २० ते २५ रुपयांनी वाढ.
जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच खाद्यतेलाच्या दरात लिटरमागे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांची जेवणाची फोडणी अधिक महागली आहे.त्याचबरोबर हॉटेल व रस्त्यावर मिळणारा वडापाव, भजी, डोसे आदी पदार्थही महागण्याची शक्यता आहे.देशातील नागरिक सर्वसाधारणपणे सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल व पामतेलाचे सेवन करतात. या सर्वांचे पिकाचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे.
त्यात केंद्र व राज्य सरकारने सोयाबीनसह सर्व पिकांच्या हमीभावात वाढ केली. सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून केंद्र सरकारने खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात ३० टक्के वाढ झाली. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात खाद्यतेलाचे दर वाढले. तेलाच्या एका लिटरमागे २० ते २५ रुपये वाढझाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.