पावसमध्ये मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरीला, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल.

रत्नागिरी तालुक्यातील पावस गोडबोलेवाडी येथे मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत घडली. एकूण ८० हजार रुपये किंमतीच्या ४५ बॅटर्‍या चोरीला गेल्याची तक्रार पूर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरी करणार्‍या अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला. सुहास दत्ताराम चव्हाण (४४, रा. गवाणे लांजा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चव्हाण हे पावस गोडबोलेवाडी येथील मोबाईल टॉवरच्या देखरेखीचे काम करतात.

या टॉवरच्या तळाशी पत्र्याची बंदिस्त केबिन असून त्यामध्ये बॅटर्‍या ठेवण्यात आल्या होत्या. २८ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत चोरट्याने पत्र्याच्या केबिनचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच आतील ४५ बॅटर्‍या चोरून नेल्या अशी तक्रार पूर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पूर्णगड पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button