
आवश्यक असेल तेव्हाच मार्गदर्शक सूचना जारी करणार जिल्हाधिकारी यांचे स्पष्टीकरण
जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच मी मार्गदर्शक सूचनांनुसार ऑर्डर जारी करेन आणि तेच वैध असेल असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा स्पष्ट केले असून त्यामुळेच राज्यात सुरू झालेल्या अनलॉक प्रक्रियेबद्दल रत्नागिरी मध्ये कोणत्याही गोष्टीत गोंधळ होऊ नये असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हयात ९ जून पर्यंत तरी लॉकडाऊन कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या टप्प्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याने सोमवारपासून चौथ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू केली आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासन नेमके कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते सध्याच्या प्रशासनाच्या भूमिकेप्रमाणे नऊ तारखेपर्यंत लॉकडाॅउन कायम राहण्याची चिन्हे असून त्यानंतर प्रशासन चौथ्या टप्प्याच्या नियमावलीची अंमलबजावणी करेल असा अंदाज आहे
www.konkantoday.com