
कै. बाबुराव आणि कै. मालतीबाई जोशी यांनी स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलीत केली- श्रीपाद नाईक
तापलेल्या वाळून पाय पोळावेत आणि अपमान पदरात घेवून केवळ लोकसेवेसाठी स्वतःला झोकून देणारे व्यक्तीमत्व म्हणजे कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलीत केली. निराबाई हेगडे, चंद्राबाई देशपांडे आणि सोनू देशपांडे तीन मुलींना घेवून १ जानेवारी १९२५ रोजी शाळा सुरू झाली.
ही ऐतिहासिक घटना आहे, असे प्रतिपादन केंद्रीय उर्जा राज्यमंत्री तथा र. ए. सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केले.र. ए. सोसायटीची मातृसंस्था सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रम उदघाटन प्रसंगी बुधवारी ते बोलत होते. कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी सामाजिक सेवेसाठी शिक्षण क्षेत्र निवडले.
तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त, गुरफटलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी या दांपत्याने स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली असे नाईक म्हणाले.www.konkantoday.com