
निवळी उड्डाण पुलाच्या प्रश्नावरून ग्रामस्थ व व्यापारी आमने- सामने.
मुंबई-गोवा महामार्गाच्या उखडलेल्या आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांच्या कामांनी वेग घेतला असून दोन्ही टप्प्यातील कामे ६५ टक्क्याहून अधिक झाली आहेत. पुलांची कामेही सुरू झाली आहेत. त्यात निवळी येथील उड्डाण पुलाच्या प्रश्नावरून ग्रामस्थ व व्यापारी वर्गात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीला पूल हवा आहे आणि व्यापार्यांना पूल नको, असल्याने राजकीय हस्तक्षेपासाठी प्रयत्न सुरू आहे.
ग्रामस्थ व व्यापार्यांची भूमिका पाहून महामार्गाच्या अधिकार्यांनी याचा चेंडू आता केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांकडे टाकला आहे.राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यात रखडले आहे. यातील आरवली ते तळेकांडे आणि तळेकांटे व वाकेड ही कामे विशेष करून रखडली होती.
यात संगमेश्वर शास्त्री नदीवरील पूल, महामार्गाच्या कामाचा शुभारंभ ज्या पुलावरून कामाने झाला तो सप्तलिंगी पूल, बावनदी, अंजणारी या नद्यांवरील कामेही रखडली होती. त्याचप्रमाणे निवळी, हातखंबा, पाली व लांजातील उड्डाणपुलांची कामेही थांबली होती. परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर या सर्व कामांनी वेग घेतला आहे.www.konkantoday.com