
रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरात ४ रोजी निरूपण आणि गाण्याचा कार्यक्रम.
रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरात शनिवार दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ३.३० ते ५ वाजता या वेळेत मुंबईतील नामवंत गायक लाकारांचा निसर्गातून शिकवण म्हणजे श्री दत्तगुरूचे चोवीस गुरू हा निरूपण आणि गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे खजिनदार प्रमोद रेडीज यांनी केले आहे.श्री दत्तगुरूंकडून मानवाला काय घेता येईल आणि आपले आयुष्य कसे समाधानी व आनंदी करता येईल, हे सांगितले आहे.
निसर्गावर प्रेम करा, मग तो भरभरून देतो, ही या कार्यक्रमाची संकल्पना असून हा कार्यक्रम नुसता अध्यात्मिक नसून आयुष्य समाधानी ठैवण्यासाठी विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे. निरूपण आणि गाण्याच्या या कार्यक्रमात मिलिंद करमरकर, मंदार पारखी, माधुरी करमरकर, अदिती प्रभूदेसाई, सुवर्णा कागल घैसास, मधुरा पोतनीस हे गायक कलाकार असून तबला साथ राजेंद्र दातार आणि संवादिनी साथ संदीप मेस्त्री हे करणार आहेत.www.konkantoday.com