
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली भेट !
दुर्दैवी घटना घडली; गेलेली व्यक्ती परत येणार नाही… शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचू.देशमुख यांचे कुटुंब उभे राहिले पाहिजे, म्हणून मदत केली. मदत केली म्हणजे आमची जबाबदारी संपली असे नाही… आम्ही कायम देशमुख कुटुंबाच्या सोबत आहोत, असा निरोप एकनाथ शिंदे यांचा घेऊन आलो.पोलीस अधीक्षकांना तपास करायला वेळ दिला पाहिजे.शेवटच्या आरोपीपर्यंत शासन पोहोचेल.
आम्ही सगळे तुमच्या दुःखात सामील आहोत.सरपंच म्हणून देशमुख यांची जी इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी विकासाची ताकद तुमच्या मागे उभी करू.भविष्यात अशी घटना घडणार नाही, यासाठी योग्य बंदोबस्त करू.देशमुख यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता महाराष्ट्र शासन घेईल.*- उदय सामंत**मराठी भाषा व उद्योगमंत्री**महाराष्ट्र राज्य*