मोदींच्या विकास यात्रेत आपणही सहभागी होऊया : ना. नारायण राणे जिल्हा व्यापारी आघाडीच्या मेळाव्यात केले संबोधन

*रत्नागिरी | प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा देश विकसित करायचा आहे, त्यांच्या या प्रगतीच्या यात्रेत आपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सुद्धा असला पाहिजे, म्हणूनच ज्यांना काही करायचेच नाही ते फक्त शिव्या देत राहतात आपण विकासासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवूया असे आवाहन भाजपा महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी जिल्हा व्यापारी आघाडीच्या मेळाव्यात केले. यावेळी व्यासपीठावर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार बाळ माने, युवक शहराध्यक्ष विक्रम जैन, लोकसभा निरीक्षक संदीप कुरतडकर, राजू भाटलेकर, हरीभाई पटेल भगतसिंग चुन्डावंत, सतीश पटेल उपस्थित होते. तर या मेळाव्यासाठी चिपळूणपासून राजापूर पर्यंत मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होता. यावेळी बोलताना ना. राणे म्हणाले कि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या विकास यात्रेमध्ये कोकणचा आपला हक्काचा खासदार असावा यासाठी इथे आपल्याला आवाहन करायला मी आलो आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारताने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, भारताचे आर्थिक उत्पन्न वाढावे, निर्यात वाढावी, परदेशी चलन वाढव यासाठी पंतप्रधानांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. देशासाठी मोदिनी आपले आयुष्य वाहून घेतले आहे . प्रत्येक घटकाकडे त्यांचे लक्ष असते, कोरोन काळात देशातील जनतेच्या केवळ अन्नाची नव्हे तर त्यांच्या आरोग्य, निवास यासाठीही महत्वाची पावुले उचलली आहेत. बंद पडलेले कारखाने, बेरोजगार झालेले कामगार यांच्यासाठी माझ्या खात्याला अर्थसहाय्य करत बंद पडलेले उद्योगचक्र पुन्हा वेगाने सुरु केले आहे. देशाकडे वाकड्या नजरेन पाहणार्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे. भारत विकसित बनेल, महासत्ता बनेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. ५०० वर्षांच्या वनवासात असलेला राम आज अयोध्येत त्याच्या मंदिरात विराजमान झाला आहे आणि त्यांचे हे कार्य सुरूच आहे, म्हणूनच असा तपस्वी, दृढनिश्चयी व्यक्तिमत्व तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान पदी हवे आहे असे ना. राणे म्हणले. त्यामुळे मॉर्निंग वॉक करून देशाच्या विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या, राम मंदिरातील दर्शनाचे निमंत्रण नाकारणारे राहुल गांधी आणि कॉंग्रेस हे या देशाचे नेतृत्व करू शकत नाहीतच पण हिंदुत्वाची नाळ केवळ मुख्यमंत्रीपदासाठी तोडणार्या, केवळ ५ खासदार असणाऱ्या उद्धव ठाकरे यानाही पंतप्रधान मोदींवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही असेही ना. राणे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात कुठलेही वैचारिक, सामाजिक, विकासात्मक संदर्भ नसतात, ते फक्त शिव्या देतात आणि ज्यांच्याकडे जनतेसाठी करायला काहीही नसते तेच अशा शिव्या घातलात असा टोला ना. राणे यांनी ठाकरे यांना लगावला. या कोकणाला विकसित करताना येथील उद्योग धंदे वाढावे, व्यवसाय वाढावे, रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी येथे प्रकल्पांची गरजा आहे. मात्री मोदी लाटेत दोन वेळा खासदार झालेल्यांनी आलेल्या प्रकल्पाला केवळ विरोध करण्याचे काम केले आहे अशी टीका खा. राऊत यांचे नाव न घेता राणे यांनी केली. कोकणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी सगळ्यांनी साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button