रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांकडून तब्बल १९ जणांवर प्राणघातक हल्ले.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांनी तब्बल १९ जणांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यात चारजणांचा मृत्यू झाला. तसेच १४ जण गंभीर जखमी, तर एकजण किरकोळ जखमी झाला.यातील मृतांच्या नातेवाइकांना आतापर्यंत ९८ लाख १५ हजार ४४५ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. बिबट्या, रानगवा, रानडुक्कर, अस्वल, माकड या वन्यप्राण्यांच्या व काहीजण मगरीच्या हल्ल्यात जखमी झाले. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र रानगाव, रानडुक्कर व अस्वलाच्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला.गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार वाढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button