उद्धव सेनेत आरोप प्रत्यारोप सुरू ,काही पदाधिकाऱ्यांनी निष्ठा सिद्ध करण्यासाठी हातिसच्या दर्ग्याकडे घेतली धाव.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा कोकणात धुव्वा उडाला. कोकणातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. रत्नागिरी, राजापूर या मतदारसंघातही ठाकरेंचे उमेदवार पराभूत झाले.त्यामुळे पक्षातील अंतर्गत बैठकीत पदाधिकाऱ्यांमधील वाद उफाळून आला. लोकसभेत याठिकाणी विनायक राऊत यांचा नारायण राणेंनी पराभव केला त्यानंतर विधानसभेतही पक्षाला फटका बसला. त्यामुळे विनायक राऊतांनी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यात पक्षातील वाद चव्हाट्यावर आला. त्यातच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी पक्षावरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी थेट दर्गा गाठला.

कोकणात शपथ घेण्याला फार महत्त्व असते, एखाद्या प्रसिद्ध मंदिरात, जागृत देवस्थान किंवा ग्रामदेवतेकडे जाऊन शपथ घेतली जाते. यात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पीर बाबर शेख दर्गा गाठून तिथे पक्षातील निष्ठेची शपथ घेतली त्यामुळे तेचर्चेत आले आहेत. आपण चुकीचं काम केले नाही. पक्षाचा विश्वासघात केला नाही असा या कार्यकर्त्यांचा दावा होता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा देवासमोर शपथ घेण्याचं ठरले त्यात ठाकरेंचे कार्यकर्ते पीर बाबर शेख दर्ग्यात गेले आणि त्यांनी तिथे निष्ठेची शपथ घेतली मात्र जिल्हा पातळीवरील अनेक पदाधिकारी गैरहजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button