
चिपळूण येथील शेतकर्यांना खत न मिळाल्यास कृषि कार्यालयाला टाळे ठोकू -मनसेने अधिकार्यांना खडसावले.
जिल्हाधिकार्यांना तोंडी कळवले सांगताय ते काय तुमच्या घरातले आहेत काय? तुमचा कारभार तोंडी चालतो का? कोकणातील शेतकरी धडपड करतोय आणि तुम्ही इथे खुर्चीत बसून गप्पा करताय, उडवाउडवीची उत्तरे द्याल तर याद राखा, अशा आक्रमक शब्दात तालुका कृषि अधिकार्यांवर मनसैनिकांनी तोफ डागली. जर शुक्रवारपर्यंत शेतकर्यांसाठी खत उपलब्ध झाले नाही तर त्याच दिवशी कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला आहे.www.konkantoday.com