बहिणींना या दिवशी मिळणार 2100 रुपयांचा हप्ता! भाजपाने स्पष्ट केली भूमिका!!

मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून पुन्हा एकदा राज्यात बहुमताने महायुतीचे सरकार आले आहे. मात्र अद्याप राज्यात सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदावरून गोंधळ सुरू असलेला पाहायला मिळत आहे.

तसेच दुसरीकडे ज्या लाडकी बहीण योजनमुळे राज्यात महायुतीचे सरकार आले आहे असे बोलले जात आहे, त्याच बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिना उलटला तरी योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही, म्हणून सर्वत्र चर्चा आहे. त्यातच आता लाडकी बहीण योजनेबाबत भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना 2100 रुपये मिळण्यास अजून 7 ते 10 महिने लागू शकतात असे दिसत आहे. तसेच राज्य सरकारने जाहीर केले होते की, नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल. मात्र नोव्हेंबर महिला उलटला तरी महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही. तसेच या योजनेचे पैसे महिलांच्या महिलांच्या खात्यात येण्यास विलंब होऊ शकतो, असे भाजपाचे नेते मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील जनतेला आश्वासन दिले होते की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करणार आहोत. तसेच आम्ही 100 टक्के दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहोत. तसेच जर या आश्वासनानुसार आम्ही रक्कम 1500 वरून 2100 वाढवली नाही, तर भाजपाची खराब प्रतिमा देशभर पसरवली जाईल. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की, आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला पाहिजे. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने धुळीस मिळू देणार नाही. तसेच आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला 2100 रुपये देण्याची क्षमता आहे. आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल, असे मला वाटत नाही. तसेच वाढलेली रक्कम कधीपासून दिली जाईल? यावर चर्चा केली जाईल.

आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले आहे. पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरलेल्या महायुतीच्या यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. महायुतीने तब्बल 235 जागा जिंकल्या असून त्यांच्या या विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजनेला दिले जात आहे. महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे. त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी देखील ते मान्य केले आहे.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिल होत राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देऊ, मात्र आता त्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपयाच्या हफ्त्यासाठी पुढच्या भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button