
रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, मच्छी व्यावसायासाठी गुरखे दाखल.
संगमेश्वर परिसरामध्ये थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने आंबा, काजू पिकांना पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे आंबा कलमांना मोहर येण्याची प्रक्रिया काही दिवसात सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या बागेच्या राखणीसाठी गुरखे या परिसरामध्ये येण्यास सुरूवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर बागायतदारांच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट असली तरी परिसरामध्ये संभाव्य धोका टाळण्यासाठी या गुरख्यांची नोंदणी करणे काळाची गरज ठरली आहे. या दृष्टीने धोका टाळण्यासाठी परप्रांतीयांतून येणार्या लोकांची माहिती तातडीने पोलीस ठाण्यात जमा करून घ्यावी अशी मागणी केली जात आहे. www.konkantoday.com