मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात पुलावरून कार खाली कोसळली पती-पत्नीचा मृत्यू.

मुंबई गोवा महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत रायगड जिल्ह्यात मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महाड बाजूकडून मुंबईच्या दिशेनं निघालेली मारुती सुझुकी सेलेरिओ या कारच्या चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं एक भयंकर अपघात घडला.चालकानं कारवरील नियंत्रण गमावताच महामार्गावरून थेट पुलाचा कठडा तोडून ही कार पुलावरून खाली कोसळली. हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की यामध्ये कारचा पूर्णतः चक्काचूर झाला.

या कारमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करत होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. देवयानी दशरथ दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर राहणार अँटॉप हिल मुंबई अशी मृतांची ओळख समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button