उदय सामंत यांनी स्वतः बाईक चालवत युवासेनेच्या रॅलीत सहभाग घेतला.

रत्नागिरी येथे महायुती युवासेना आयोजित बाईक रॅलीला राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी स्वतः बाईक चालवत युवकांसोबत आनंद घेतला. रॅलीच्या निमित्ताने हजारो युवक एकवटले होते.

खऱ्या अर्थाने ही बाईक रॅलीतील माझ्यावर प्रेम, निष्ठा असणारे हजारो युवकांची उपस्थिती पाहून आजच विजय पक्का झाल्याचं विश्वास वाटतो. तुमची ही निष्ठा आणि प्रेम मला राज्यासह रत्नागिरीच्या विकासाकरिता प्रेरणा देते. या रॅलीने महायुतीच्या विजयाची शंखनाद केला आहे असे ह्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले. या रॅलीत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच हजारोच्या संख्येने बाईक राइडर आणि मतदार बंधू उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button