राजापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर सुतार यांचा राजीनामा

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राजापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर सुतार यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष समोर आला आहे.राष्ट्रवादीचे युवक नेते अजित यशवंतराव यांना काँग्रेस मध्ये प्रवेश देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन तट पडले आहेत यशवंतराव यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी पक्ष निरीक्षकांसमोर मुलाखतही दिली होती.मूळ काँग्रेस कार्यकर्त्यांना किंमत देण्यात येत नाही अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झाली होती. सुतार यानी सात महिन्यांपूर्वी स्वीकारलेल्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सोडली असून त्यानी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांचेकडे पाठविला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button