
मिऱ्यावासीयांनी नामदार उदय सामंत यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून शिवसेनेत केला प्रवेश….
मिऱ्यावासीय ठामपणे उदय सामंत यांच्याच पाठीशी....
घाऱ्या मयेकर, रुपेश शिवलकर, अमोल विलणकर, दादा शिवलकर, संदीप शिरधनकर, सुरेंद्र शिरधनकर, शशांक सावंत आणि ग्रामपंचायत सदस्य रामदास बनप यांच्या पुढाकाराने मिऱ्यावासीयांनी मंत्री उदय सांमंत यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, मिऱ्या ग्रामस्थ यांनी संपूर्ण मिऱ्या गावाच्या विकासासंदर्भात मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांकडून मिऱ्या गावाच्या विकासासंदर्भात पसरवले जाणाऱ्या चुकीच्या प्रचाराला चाप लावत सांगितले की, मिऱ्या गावामध्ये विरोधकांकडून जाणून-बुजून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत ज्यांनी एमआयडीसीची मागणी केली होती तेच आता उबाठा पक्षात गेले आहेत, परंतु आम्ही मिऱ्या गावकऱ्यांसोबत आहोत आणि त्यांच्या सहमतीनेच मिऱ्या गावाचा विकास होत आहे आणि भविष्यात होत राहील असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले. आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित असलेले जाकिमिऱ्या ग्रामपंचायत सदस्य रामदास बनप, स्मिता शिरधनकर, राणी भाटकर, माजी सदस्य अनन्या शिवलकर, दिपीका मयेकर, राखी शिवलकर, रक्षा शिवलकर, मोहिनी सुर्वे, रिद्धी शिवलकर, ऋताली शिवलकर, नम्रता शिरधनकर, विशाखा शिवलकर, आराध्या सुर्वे, निकीता शिरधनकर, अंकीता शिरधनकर, सीद्धी शिवलकर, पायल चव्हाण, मनीषा शिवलकर, मीना हातीसकर, सुरेंद्र शिरधनकर, कनक शिवलकर, शशांक सावंत, अमिल सावंत, अभि सावंत, हर्षल साळवी, सागर कदम, अजित शिवलकर, मुन्ना भाटकर,अक्षय सुर्वे,समीक्षा भाटकर, चैत्राली पेजे, निलम बनप, विवेक मयेकर यांनी नामदार उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला तसेच मिऱ्या गाव या निवडणुकीमध्ये एक गठ्ठा उदय सामंत यांच्याच पाठीशीच ठामपणे राहणार याची ग्वाही दिली.