
आचारसंहितेच्या काळात जिल्ह्यात परवानाधारक २ हजार ८९४ शस्त्रे जमा.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी परवानाधारक शस्त्रे (पिस्टल, रायफल, बंदूक) जमा करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सर्व पोलीस ठाण्यंना दिले होते. जिल्ह्यातील ३ हजार १६४ पैकी २ हजार ८९४ शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यात येणारी ही अग्निशस्त्रे आचारसंहिता संपल्यानंतर परत देण्यात येणार आहेत.मोठे व्यावसायिक, राजकारणी, याशिवाय विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवान काढला जातो. जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत गृहविभागाच्या परवानगीने परवाना दिला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार १६४ जणांनी शस्त्र परवान घेतले आहेत. सध्या आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक काळात वाद-विवाद, वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता असते त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या संयुक्त समितीने पिस्तुल, रायफल व इतर अग्निशास्त्र जमा करुन घेण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाणेदारांना दिले आहेत. www.konkantoday.com