मंडणगड धुत्रोळी येथील रस्त्यात पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची चाळण

मंडणगड धुत्रोळी येथील रस्त्यात पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची चाळण तर झाली आहेच मात्र हा रस्ता आता मृत्यूचा सापळा ठरण्याचा धोका अधिक वाढला आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन जा-ये करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.मंडणगड तालूका मुख्यालयाकडून भिंगळोली मार्गे धुत्रोळीकडून म्हाप्रळ आंबेत मुंबई पूणे या महत्वाच्या शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचे म्हाप्रळ या महसुली गावाच्या हद्दीपासून पुढे चिंचाळी, शेनाळे, शिरगाव, धुत्रोळी, मंडणगडकडे येणारा रस्ता हा पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. सध्या हा मार्ग लोणंद राजेवाडी ते आंबडवे राष्ट्रीय महामार्ग नावाने नव्याने विकसीत होत आहे. त्यामुळे या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी आता राहीलेली नाही तर ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची झालेली आहे. मात्र नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या नावाखाली तो रस्ता वाहतुक योग्य राहीलेला नाही. त्यामुळे नवा रस्ता पूर्ण होईतोवर किमान रस्त्यातील खड्डे बूजवून मार्ग वाहतुकीस सुरळीत करावा. कारण या मार्गाशिवाय केवळ मंडणगड येथीलच नव्हे तर काही दापोली तालूक्यातीलही गावातील रहीवाशांना पूणे मुंबईकडे ये जा करण्यासाठीचा अन्य पर्याय नाही आणि रस्त्याची सुधारणाही नाही त्यामुळे खड्डयातील रस्त्यातून तर आहेच शिवाय मृत्यूच्या सापळयातूनच जणू प्रवास करण्याची वेळ प्रवास करणा-यांवर आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button