
थोडे भावनिक व्हायचे आणि डोळ्यात पाणी आणायचे हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे लांजा-राजापूर मतदार संघात सुरू -उदय सामंत.
मतदार संघात जावून मतदारांसमोर हात जोडायचे, थोडे भावनिक व्हायचे आणि डोळ्यात पाणी आणायचे हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे लांजा-राजापूर मतदार संघात सुरू होता. त्यामुळे काही लोकांनी भावनेच्या आधारे गेली १५ वर्षे लांजा-राजापूर मतदार संघाला मागे टाकले, असा खोचक टोला अप्रत्यक्षपणे आमदार राजन साळवी यांना उदय सामंत यांनी लांजा येथे बोलताना लगावला.लांजा शहरातील आग्रे हॉल येथे सोमवारी पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे लांजा-राजापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल कुरूप, तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेवक सचिन डोंगरकर, क्षेत्र समन्वयक एस. एन. कांबळे, जिल्हा सचिव वसंत घडशी आदी उपस्थित होते.www.konkantoday.com