
महाजनादेश यात्रेत कोकणच्या विकासाची नांदी
रत्नागिरी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाचे महापुरुष आहेत. त्यामुळे राज्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. कोकणच्या विकासाकरिता मोठा उद्योग आला पाहिजे. राजापूरमध्ये एम्स रुग्णालय होण्याकरिता आग्रही आहोत. जल व विमान वाहतूक, पर्यटन विकास, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण लवकर होण्याकरिता मुख्यमंत्री पॅकेज जाहीर करतील, असा विश्वास अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. ही यात्रा 17 सप्टेंबरला रत्नागिरीत येत आहे. यानिमित्त लाड यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.ते म्हणाले की, मच्छीमारांचा प्रश्न, रेल्वे दुपदरीकरण, पावसाचे पाणी अडवून जिरवणे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. चिपळूण-कोल्हापूर, दापोली-महाबळेश्वर मार्ग, जयगड बंदर सर्वसामान्यांसाठी खुले करणे आणि शैक्षणिक विकासाकरिता मुख्यमंत्री नक्कीच घोषणा करतील. कोकणात 30 हजार नैसर्गिक तळी असून त्यांचे पुनरुज्जीवन केल्यास टंचाई दूर होईल. कोकणी लोक पापभिरू आहे, त्यामुळे शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता मेहनत घेतली जाणार आहे.लाड यांनी सांगितले की, सिंधुदुर्गमधून राजापूरपर्यंत शेकडो गाड्यांच्या ताफ्यात यात्रा येईल. तिथून आडिवरे, पावस येथे ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पवृष्टी करत मुख्यमंत्र्यांचे स्वागत होईल. त्यानंतर यात्रा जयस्तंभ येथे आल्यावर जल्लोषी स्वागत केले जाणार आहे. कणकवली येथे होणार्या सभेत 12 हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील. 200 चारचाकी, 2000 दुचाकींसह रॅली होईल. रत्नागिरीमध्ये अशी भरपूर वाहनांची दुचाकी रॅली होईल. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर बारा हजार खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. 6 वाजता सभा सुरू होईल. सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री रत्नागिरीत राहणार आहेत. दुसर्या दिवशी ते नाशिकला रवाना होतील. यात्रेच्या यशस्वीतेसाठी भाजपचे सर्व पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्य, कार्यकर्ते अथक मेहनत घेत आहेत, या सार्यांचा आढावा मी स्वतः घेत असल्याचे लाड यांनी सांगितले.
महाजनादेश यात्रेमध्ये कोणाचाही प्रवेश होणार नाही. त्यामुळेच उदयनराजे यांचाही प्रवेश दिल्लीमध्ये झाला. त्यांचे आम्ही स्वागत करतो. महाजनादेश यात्रेमध्ये जे जे कोणी येतील, त्यांचे स्वागत होईल, ही यात्रा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी ठरेल, असे लाड यांनी सांगितले.
www.konkantoday.com