भाजपाचा विधानसभेसाठी अंमलबजावणी आराखडा, मतदारांकडून सूचना मागविल्या.

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पक्षाने त्याचे स्वरूप परंपरागत जाहीरनाम्याच्या दोन पाऊल पुढे जावून आता अंमलबजावणी आराखडा करण्याचे निश्‍चित केले आहे. या आराखड्यासाठी मतदारांनी विविध मुद्यांबाबत महाराष्ट्राच्या विकासाच्या आपल्या आकांक्षा सूचनांच्या स्वरूपात पक्षाकडे पाठवाव्यात, असे आवाहन नवनिर्वाचित आमदार चित्रा वाघ यांनी येथील एका पत्रकार परिषदेत केले.यासंदर्भात येथील भाजपा जिल्हा कार्यलयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनी केंद्र व राज्यात अंमलबजावणीच्या आघाडीवर यश मिळवले आहे. परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्‍वासने असतात. संकल्प पत्र ही पुढची पायरी होती. आता सत्तेवर पुन्हा येण्याच्या आत्मविश्‍वातून आम्ही आमच्या संकल्पनातून कशाप्रकारे अंमलात आणायचा आराखडा तयार करीत आहोत, असेही वाघ यांनी सांगितले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button