परिवर्तनासाठी बाळ माने-महाडिक-बनेंच्या बंद दाराआड गुफ्तगू
रत्नागिरीत विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होण्याकरिता सक्षम उमेदवार दिला पाहिजे, या मुद्यावर उबाठा गटाचे नेते राजेंद्र महाडिक व उदय बने यांच्याशी माजी आमदार बाळ माने यांची बंद दाराआड गुफ्तगू चर्चा झाली आहे. यामुळे रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत यांच्यासमोर सक्षम पर्याय देवून परिवर्तन करण्याबाबत उबाठाचे मनसुबे आहेत.याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख ×उद्धव ठाकरे यानीही याला बळ देण्याची ग्वाही दिल्याचे समजते. त्यामुळे मातोश्रींचा आदेश उबाठा गटाला मानावाच लागेल. याबाबत अधिकृत माहिती देण्यास पदाधिकार्यांनी नकार दिला आहे. निवडणुकीच्या युद्धात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असेही एका पदाधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. शिवसेना-भाजपा युती २०१४ मध्ये तुटली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अचानक शिवसेना गटाच्या गोटात दाखल झालेल्या उदय सामंत यांनी रत्नागिरीत विजय मिळवला. यामुळे धनुष्यबाणाचा पहिलाच आमदार झाला. २०१९ मध्ये भाजप-सेना युतीमुळे सामंत पुन्हा आमदार झाले. त्यानंतर युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी रत्नागिरी शिवसेना अभेद्य होती. अडीच वर्षात राज्यात भूकंप झाला आणि शिवसेना फुटली. यात उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. रत्नागिरीतील काही पदाधिकार्यांनी सामंत यांच्यासोबत काही पदाधिकारी, कार्यकर्ते गेले. परंतु आजही उबाठा शिवसेना कणखर आहे व मातोश्रीसोबत एकनिष्ठ आहे.लोकसभा निवडणुकीत हे दिसून आले आणि उमेदवार विनायक राऊत यांना दहा ते बारा हजारांचे लीड मिळाले. आता विधानसभेच्या निवडणुकीत तीन वेळा पराभव पचवून पुन्हा एकदा बाळ बाने निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्यासमवेत तीन पर्याय आहेत. परंतु रत्नागिरीत सक्षम उमेदवार हवा याकरिता त्यांनी व्यूहरचना केली आहे. www.konkantoday.com