
प्रकरण न्यायालयात गेल्याने सात आमदारांच्या डोक्यावर टांगती तलवार.
आचारसंहिता लागू करण्यापूर्वी काही तास आधी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांऐवजी सात आमदारांची नियुक्ती करण्यास स्थगिती द्यावी, यासाठी उद्धवसेनेच्या नेत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने स्थगितीस नकार दिला. मात्र, या नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे या सात आमदारांच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे.