जयगड येथे मच्छिमारी बोटीवर चक्कर येउन समुद्रात खलाशी बेपत्ता.

जयगड येथे मच्छिमारी बोटीवर चक्कर येउन समुद्रात खलाशी बेपत्ता झाल्याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.ही घटना 28 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.30 वा. सुमारास घडली आहे.बारक्या दामा बेंदर (21,मुळ रा.विलतपाडा आंबेसरी डहाणू,पालघर) असे समुद्रात बेपत्ता झालेल्या खलाशाचे नाव आहे. याबाबत अबरार ईब्राहिम साखरकर (33,रा.सारखरतर,रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात 29 सप्टेंबर रोजी खबर दिलेली आहे. त्यानुसार,अबरार साखरकर यांच्या मालकीच्या अल दाउद या बोटीवर बारक्या बेंदर हा खलाशी म्हणून कामाला होता. 28 सप्टेंबर रोजी तो इतर खलाशांसह जयगड समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी गेला होता. रात्री 11.30 वा. सुमारास तो बोटीच्या पेरच्यावर उभा असताना त्याला अचानकपणे चक्कर येउन तो जयगड समुद्रात सुमारे 10 वाव खोलीच्या पाण्यात पडून दिसेनासा झाला. त्याचा शोध घेण्यात आला परंतू तो अद्याप कोठेही मिळून आलेला नाही. नागरिकांना हा खलाशी दिसून आल्यास त्यांनी याबाबत तातडीने जयगड पोलिस ठाणे फोन नं 9960456100 व 9405100025 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जयगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button