
शरद पवार यांच्या चिपळूण दाैऱ्यानंतर चिपळूणची जागा उद्धव सेना राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडणार?
रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या ‘माताेश्री’वरील बैठकीत चिपळूण मतदारसंघाची बैठक अचानक रद्द करण्यात आल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चिपळूण दाैऱ्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साेडण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.जिल्ह्यात चिपळूण वगळता चारही आमदार शिवसेनेचे आहेत. मात्र, राजकीय स्थित्यंतरानंतर चिपळूणचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाेबत तर दापाेली, रत्नागिरीचे आमदार शिंदेसेनेसाेबत गेले आहेत. त्यामुळे सध्या उद्धवसेनेकडे दाेन आमदार आहेत. आगामी निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला देण्याचे महाविकास आघाडीने निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच जागांपैकी चिपळूणत्यामुळे जिल्ह्यातील पाच जागांपैकी चिपळूण वगळता उर्वरित चार जागा उद्धवसेनेला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ‘माताेश्री’वर इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बाेलावली हाेती. या बैठकीत राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापाेली मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र, चिपळूणबाबतची बैठक अचानक रद्द करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर चिपळूणची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साेडण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.