
रत्नागिरी शहरातील तांबट आळी येथील महिलेचा विष प्राशन केल्याने मृत्यू.
रत्नागिरी शहरातील तांबट आळी येथील महिलेने विषारी द्रव प्राशन केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राखी अजय पवार (४४, रा. तांबट आळी रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. राखी हिने तिच्या राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले होते. यावेळी तिला अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालय व पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. १३ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान राखी यांचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.www.konkantoday.com