कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा.

हवामान विभागाने 23 सप्टेंबरचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून महाराष्ट्रात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे, हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यभर यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, हवामान खात्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणासह अनेक ठिकाणी पावसाचा इशारा जाहीर केला आहे. हवामान खात्याने मराठवाड्यात 23 आणि 24 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात 24 ते 27 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जाहीर केला आहे. दापोलीमध्ये आज दुपारनंतर हवामान बदलले असून काळाकुट्ट अंधार आणि गडगडाटासह पावसाचे पुनरागमन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button