पाटबंधारे विभागातर्फे अर्जुना व कोदिवली नदीपात्रातील उपसलेला गाळ नदी काठावरच ठेवल्याने पावसाळ्यात धोका.

पावसाळ्यामध्ये राजापूर शहरातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ पाटबंधारे विभागातर्फे उपसा केला जात आहे. यामध्ये १ लाख २७हजार २०० घनमीटरपैकी २० हजार ७०० घनमीटर म्हणजे सुमारे १६ टक्के गाळ उपसा झाला आहे. मात्र, हा गाळ नदी काठावर पिचिंग करून ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे पावसाळ्यात पाण्यासोबत नदीपात्रामध्ये वाहून जाणार आहे. त्यामुळे हा गाळ पावसाळ्यापूर्वी हटवण्याची मागणी होत आहे. राजापूर नगर परिषदेने नाम फाऊंडेशन व महसूल प्रशासनाच्या माध्यमातून अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले होते. मागील दोन वर्षे लोकसहभागातून अर्जुना व कोदवली नद्यांतील गाळ उपसा करण्यात आला होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button