सध्या जिल्ह्यातील ४२ नवीन तलाठ्यांच्या कागदपत्रांची पडताळणीच रेंगाळली.
* रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या तलाठ्यांकडे एकापेक्षा अधिक गावांची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत नवीन तलाठी हजर होणे गरजेचे आहे. मात्र गेल्या वर्षी पार पडलेल्या तलाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तलाठी मात्र अद्याप पदाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. सध्या जिल्ह्यातील ४२ नवीन तलाठ्यांच्या कागदपत्रांची पडताळणीच संपलेली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.गतवर्षी राज्यभरात झालेल्या तलाठी भरती परीक्षेेसाठी जिल्ह्यातून तब्बल ३६ हजार ८१७ परीक्षार्थीनी या पदभरतीसाठी अर्ज केला होता. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातून अर्ज केलेल्या ३५० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.www.konkantoday.com