
अधिकार्यांच्या हौशेपोटी उड्डाणपुलाचा नवा आराखडा बनवला जात असल्याचा माजी खासदार विनायक राऊत यांचा आरोप
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या उड्डाणपूल दुर्घटनेला ठेकेदार व अधिकारी जबाबदार असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.
उलट एका अधिकार्याच्या हौशेपोटी शहरातील उड्डाणपुलाची नवी डिझाईन करुन निरीक्षक चिपळूणकरांच्या जीवाशी खेळ यांच्या खेळला जात असल्याची टीका माजी खासदार, ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सोमवारी येथे केली.ते म्हणाले महामार्गाच्या दूरवस्थेबाबत आपण सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांना कशेडी बोगदा, परशुराम घाटासह पुलांची पाहणी करण्याची विनंती केली होती. मात्र केंद्र सरकारचे या महामार्गाकडे दुर्लक्ष झालं. केवळ ठेकेदाराचं हित पाहण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केले आहे.www.konkantoday.com