कंत्राटी शिक्षकभरती रद्द निर्णयाचा पुनर्विचार करा. रत्नागिरीत बैठक ; पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार.

शासनाने कंत्राटी शिक्षकभरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील ४९५ स्थानिक उमेदवारांना बसला आहे. त्यांना आता घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. या निर्णयाविरोधात उमेदवार आक्रमक झाले असून, रविवारी सर्व उमेदवारांनी एकत्र येत निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करून निर्णय अबाधित ठेवावा, अशी मागणीही केली आहे.राज्यशासनाने २३ सप्टेंबर २०२४ रोजी १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यात ४९५ स्थानिक बीएड्, डीएड् बेरोजगारांना रोजगार मिळाला. त्यांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना १५ हजार रुपये मानधन देण्यात आले.

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हा रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. शेवटी १० फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षकभरती बंदकरण्याचा निर्णय घेतला गेला. तसा जीआर शासनाकडून काढण्यात आला. या निर्णयाचा सर्वात फटका हा रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. ४९५ शाळांमध्ये आता गैरसोय होणार आहे. मुळात रत्नागिरी जिल्हा भरतीचे केंद्र बनले आहे. आंतरजिल्हा बदलीने शेकडो शिक्षक परजिल्ह्यात जात आहेत. यामुळे रिक्त पदांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जिल्ह्यात दीड हजारापेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button