आंगवली मार्लेश्‍वर मंदिर मठातील चोरीप्रकरणी अद्यापही आरोपी हाती नाहीत.

* आंगवली गावात सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून मार्लेश्‍वर मंदीर मठाची उभारणी करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी चोरीच्या उद्देशाने मठात आरोपी शिरले होते. त्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नसल्याने भक्तगणांसह नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मार्लेश्‍वरचे मूळ देवस्थान असलेल्या आंगवली मठाचा जानेवारी महिन्यात जीर्णोद्धार करण्यात आला होता. सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून आंगवली गावात नवीन मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने अनेकजण मंदिरात शिरले होते. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी प्राथमिक तपास पूर्ण केला. मंदिरातील देवाचे टोप, सोने, रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button