रत्नागिरीत २७ सप्टेंबरला पर्यटन परिषदेचे आयोजन
. रत्नागिरी येथील स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यटनाविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, लायन्स क्लब, जिल्हा प्रशासन, पर्यटन संचालनालय यांच्यातर्फे पर्यटन परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मारूती मंदिर येथील हॉटेल थिबा एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.पर्यटन शांती या संकल्पनेवर हा जागतिक पर्यटन दिन साजरा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रकिनारे, श्रीक्षेत्र गणपतीपुळे सारखे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ तसेच गड किल्ले, सह्याद्रीचे खोरे, कोकणातील आकर्षक धबधबे, जागतिक दर्जाची कातळशिल्पे अशी पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक पर्यटनस्थळे आहेत. देश विदेशातून आता फार मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत असतात. ज्याप्रमाणे येथे सोयी-सुविधा निर्माण होण्यासाठी, स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती व स्थानिक कलांना वाव देण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले होते. www.konkantoday.com