गणेशोत्सव कालावधीत बंद असलेली महामार्गावरील अवजड वाहतूक पूर्ववत.
गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५ सप्टेंबरपासून अवजड वाहतुकीला ब्रेक लागला. १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत होणार आहे.रखडलेल्या चौपदरीकरणासह महामार्गावरून धावणार्या अवजड वाहनांमुळे गणेशोत्सवादरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न उभा ठाकतो. अवजड वाहनांमुळे होणार्या वाहतूक कोंडीतून चाकरमान्यांची वाहने मार्गस्थ करताना महामार्गावर तैनात स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांची दमछाक होते. या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबरपासून महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती.१२ दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशोत्सव संपुष्टात येणार आहे. मंगळवारी सायंकाळपासूनच चाकरमानी परतीला निघणार आहेत. यामुळे परतीच्या प्रवासात मंगळवारी ८ वाजल्यापासून १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजल्यानंतर अवजड वाहनांच्या वाहतुकीला नियमितपणे मुभा दिली जाणार आहे. www.konkantoday.com