कै.निलेश बापट स्मृतीप्रीत्यर्थ 22 सप्टेंबर रोजी शोकसभेचे आयोजन

चिपळूण:– संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग संवर्धनाच्या कामातील अग्रणी कार्यकर्ते , तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक निलेश बापट यांचे नुकतेच 14 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. कै. निलेश बापट यांचे निसर्ग क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील काम हे खुप मोठे आहे. अत्यंत निस्वार्थी हेतूने काम करणाऱ्या या निसर्गसेवक कार्यकर्त्याच्या अकाली झालेल्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . या दुःखातून त्यांनी लवकरात लवकर सावरावे या हेतूने तसेच या निस्वार्थी कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहण्याकरिता शोकसभेचे आयोजन रविवार दिनांक *22 सप्टेंबर 2024* रोजी *सायंकाळी चार वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ, बेडेकर सभागृह, वीरेश्वर कॉलनी चिपळूण* येथे करण्यात आले आहे . कै. निलेश बापट यांचा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठा मित्रपरिवार असून त्याच्या अकाली जाण्यामुळे हा मित्रपरिवार शोकमग्न आहे. तरी सर्व निसर्गप्रेमी, आणि बापट कुटुंबीयांच्या हितचिंतकांना आवाहन करण्यात येत आहे की कै. निलेशच्या निसर्ग क्षेत्रातील कार्याला समजून घेण्याकरीता आणि श्रद्धांजली वाहण्याकरिता, कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याकरीता सर्वांनी या शोकसभेसाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन या शोकसभेचे संयोजक निसर्ग कार्यकर्ते ,ग्लोबल संस्थेचे सर्व कार्यकर्ते , आणि निलेश बापट मित्रपरिवार चिपळूण यांचे तर्फे करण्यात येत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button