
राजापूर शहरासह ग्रामीण भागात मलेरियाचे रूग्ण.
राजापूर शहरासह लगतच्या ग्रामीण भागामध्ये मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांमध्ये या आजाराची लक्षणे अधिक असून काही स्थानिकांनाही या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे राजापूर शहरामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून डास नियंत्रणासाठी फवारणी करावी, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. त्यानंतर तत्काळ प्रशासनामार्फत शहरात फवारणीला सुरूवात करण्यात आली. www.konkantoday.com