स्वामी स्वरूपानंदांच्या ५०व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त वरचीआळी येथील आध्यात्म मंदिरात शनिवारपासून दोनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन.

पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे स्वामी स्वरूपानंदांच्या ५०व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त वरचीआळी येथील आध्यात्म मंदिरात शनिवारपासून (ता.१४) दोनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. स्वामी स्वरूपानंदांनी रचलेल्या अभंगांवर ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेचे तिसरे सत्र शनिवारी (ता. १४) व रविवारी (ता. १५) सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळात आध्यात्म मंदिरात होणार आहे. उद्या डॉ. निशिगंधा पोंक्षे या आता ‌’मज एक विठ्ठलाचा छंद‌’ या अभंगावर निरूपण करून गुंफणार आहेत. रविवारी अंजली साने (चिपळूण) या ‌’मन हे चंचल स्वभावे ओढाळ‌’ या अभंगावर निरूपण करून गुंफणार आहेत. या कार्यक्रमात ज्या अभंगावर वक्ते निरूपण करणार आहेत त्या अभंगाचे गायन विजय रानडे हे करणार आहेत. अभंगाला त्यांनीच संगीत दिले आहे. श्रोत्यांनी या निरूपणाचा अवश्य लाभ घ्यावा, अशी विनंती स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ व आध्यात्म मंदिर, रत्नागिरी व्यवस्थापन कमिटी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button