मुंबईकडे परतणार्या चाकरमान्यांसाठी तीन दिवस खेडमधून दररोज सुटणार विशेष रेल्वे.
गणेशोत्सवानंतर मोठ्या संख्येने मुंबईकडे परतणार्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने खेडमधून सहा विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. १३, १४, १५ सप्टेंबरला सलग तीन दिवस या गाड्या खेड स्थानकातून रवाना होतील. या गाड्या पनवेलपर्यंत धावतील. सकाळी सहा आणि दुपारी सव्वा तीन वाजता खेड स्थानकातून या अनारक्षित गाड्या रवाना होतील. या गाड्यांना वीस बोगी असतील. या गाड्यांना खेड ते रोह्यापर्यंत सर्व स्थानकाला थांबे असतील. पुढे या गाड्या रोहा आणि पनवेलला थांबतील. १५ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजता सुटणारी ट्रेन मात्र सीएसटीपर्यंत धावेल. य गाडीला पनवेल, दादर आणि ठाणे स्थानकातही थांबा असेल, या गाड्यांच्या घोषणेमुळे कोकण रेल्वेच्या खेड स्थानकात होणारी गर्दी कमी करण्यात यश येणार आहे. www.konkantoday.com