दांडे पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या महिनाभरात या पुलावरून वाहतूक सुरू होईल-माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे

दांडे अणसुरे पूल वाहतुकीस लवकरच खुला होणाररत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणार्‍या सागरी महामार्गावरील राजापूर तालुक्यातील दांडे पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या महिनाभरात या पुलावरून वाहतूक सुरू होईल, अशी माहिती माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे यांनी दिली. या पुलाचे काम तातडीने पूर्ण होवून प्रवाशांची होणारी गैयसोय दूर होण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलेसागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलासाठी तत्कालीन विधानपरिषद आमदार खलिफे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला होता. मात्र पुल बांधल्यापासून सुमारे पाच वर्षातच नादुरूस्त झाला होता. दांडे अणसुरे बाजूकडील पुलाचा काही भाग खचल्यामुळे तो धोकादायक झाला होता. त्यामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करून दुरूस्तीचे काम हाती घेण्याात आले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button