
अंगणवाडी कर्मचार्यांचे २३ सप्टेंबरपासून विविध मागण्यांसाठी मुंबई आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन
आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २३ सप्टेंबरपासून मुंबई आझाद मैदानावर कृती समितीच्या नेत्यांचे बेमुदत उपोषण, तर २५ रोजी राज्यभर अंगणवाडी कर्मचार्यांचे जिल्हा परिषदांवर मोर्चे, धरणे, जेलभरो व अन्नत्याग आंदोलन होणार आहे. तसे निवेदन समितीने मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री यांना दिले आहे.निवेदनात महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचार्यांना मागधनवाढ करावी, दरमहा पेन्शन देण्यात यावी. ग्रॅज्युईटी देण्यात यावी. यासंबंधी प्रस्ताव समितीने सरकारला सादर केला असून याचे शासकीय आदेश विनाविलंब निर्गमित करावे, अशी अंगणवाडी कर्मचार्यांची मागणी आहे.www.konkantoday.com