मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरण न झालेल्या रस्त्यांचे युद्धपातळीवर डांबरीकरण.

गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून कोकणच्या वाटेवर निघालेल्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास यंदा काहीसा सुकर होण्याची चिन्हे आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरण न झालेल्या रस्त्यांचे युद्धपातळीवर डांबरीकरण करण्यात येत असून येत्या दोन दिवसांत ती कामे पूर्ण होतील, असा यंत्रणांचा दावा आहे.दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास त्या माऱ्याने डांबरीकरण उघडे पडून पुन्हा रस्ते खड्डेमय होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.येत्या शनिवारी गणरायाचे आगमन होणार असून कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, ठाण्यातून हजारो कुटुंबे बुधवारी (दि. ४) रात्रीपासून वेगवेगळ्या वाहनांतून कोकणात जायला (पान १२ वर)(पान १ वरून) निघणार आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील काही पट्ट्यांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण यंदाही पूर्ण झालेले नाही. यावरून गेल्या काही दिवसांपासून आंदोलने सुरू झाली होती. तसेच यंदाही कोकणातील प्रवास त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली. होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button